ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

दौंडच्या वासुंदे परिसरात बसतात भु-गर्भाला भुकंपासारखे धक्के, ‘मुख्यमंत्री शिंदे’ च्या सरकारमधील अधिकाऱ्यांच्या फितूरीमुळे माफिया शेतकऱ्यांच्या मुळावर

पुणेरी टाइम्स टीम
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे येथील खाण उद्योग विकास कामांसाठी वरदान ठरत आहेत मात्र स्थानिकांसाठी शाप ठरलेले आहेत. येथील खाण उद्योगासाठी वापरण्यात येणारे बोअर ब्लास्ट भुकंपापेक्षा काही कमी नाहीत. मोठमोठ्या प्रमाणात फोडण्यात येणारे भु-सुरुंग यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. हे खाण उद्योग व बोअर ब्लास्ट येथील जीविताच्या दृष्टीने अत्यंत घातक बनलेले आहेत. भु – सुरुगांचे स्फोट स्थानिकांना धडकी भरवणारे आहेत. मात्र या सर्व गोष्टीवर प्रशासनाची मेहरबानी असल्याचे दिसून येत आहे, मात्र कारवाई शून्य आहे. त्यामुळे येथील बोअर ब्लास्ट शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहेत. येथील बोअर ब्लास्ट बंद करण्याची मागणी नागरिकांनी लेखी अर्जाद्वारे अनेक वेळा केली आहे. मात्र प्रशासनाने त्यास नेहमी दुजोरा दिला आहे. जमिनीचा मोठ्या प्रमाणात र्हास होत असून, पर्यावरणीय नुकसान होत आहे. कोट्यवधी पर्यावरणीय मुल्यांचे नुकसान होत असताना येथील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले क्रशर, खाण उद्योग, बोअर ब्लास्ट सुरु कसे? असा सवाल स्थानिक व पर्यावरणप्रेमींना पडत आहे. येथील प्रशासनाला भारतीय वनसंरक्षक कायदा व पर्यावरण संरक्षणाचा विसर पडलेला आहे. पर्यावरणीय मुल्यांचे झालेले नुकसान हे येथील व्यवसायिकडून वसूल करण्यात यावे तसेच येथील पर्यावरणास हाणीकारक असलेले हे उद्योग कायमस्वरूपी बंद करण्याची गरज आहे‌.

महसूल प्रशासनाचा सावळा गोंधळ खाण माफियांसाठी चांगलाच मानवत आहे, शासनाच्या दृष्टीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र येथे यांस रितसर बगल दिली जात आहे. त्यामुळे महसूल विभाग याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष द्यावे लागणार आहे…
गौण खनिज उत्खननासाठी तयार करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसताना गेंड्याची कातडी पांघरून सुस्त पडलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार व नियमबाह्य बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या खाण व्यवसायाला लगाम कधी लागणार हे पाहणं गरजेचे आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन यांना न्यायासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत हे या ‘लोकाभिमुख’ सरकारच्या प्रतिमेला लाजवणारी गोष्ट आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे, मुख्यमंत्री साहेब तुमचे प्रशासन इथं शेतकऱ्यांसाठी नाही तर फितूर होवून खाण माफियासाठी काम करीत आहे, या प्रशासनाचा हिशोब ठेवणे गरजेचे आहे. येथील शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या माफियांना आपल्या प्रशासनाने आवर घालून नियमबाह्य बेकायदेशीर व्यवसाय कायमस्वरूपी बंद करून येथील शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे..

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]