पुणेरी टाइम्स टीम…
मराठा आरक्षण आंदोलनाची अंतिम लढाई सुरू आहे. आंदोलकांचा जीव राहतो की जातो… अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारला मराठा आरक्षण असो की धनगर आरक्षण… आरक्षण आंदोलनाचे सरकारला गांभीर्य नाही? दररोज एक जण आत्महत्या करत आहे. मुंबईत मुख्यमंत्री दिवसाला 27 दहीहंडी मंडळाला भेट देतात. मात्र आमरण उपोषणाकडे पाठ फिरवतात याचा अर्थ काय?* खरंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन मंत्रिमंडळाची बैठक जालन्यामध्ये घ्यायला पाहिजे होती, परंतु समाजाचे दुर्दैव आहेअसे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
फक्त सत्तेसाठी सर्व काही सुरू आहे. *”बाप बढाना भैय्या, सबसे बडा रुपया…”* अशी परिस्थिती आहे. ज्या समाजातून आलो, ज्या समाजाने मोठे केलं… त्याकडे पाठ फिरवणे हा कपाळ करंटेपणा आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे असेही यावेळी संतोष शिंदे म्हणाले…