ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी बाबत दौंड तहसील कार्यालयाकडून या महत्त्वाच्या सूचना…वाचा सविस्तर…

पुणेरी टाइम्स टीम…

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विसयो- २०१८/प्र.क्र.६२/विसयो मंत्रालय मुंबई दि. २० ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णयाप्रमाणे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुदान घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत हयात असलेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. तसेच दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जुन या कालावधीत (५० वर्षावरील लाभार्थ्यांना दर ५ वर्षांनी) उत्पन्न दाखला देणे सक्तीचे असते.

परंतु उपरोक्त कालावधीत लोकसभा निवडणूक कार्यक्रम असल्याने हयातीचे व उत्पन्नाचे दाखले लाभार्थ्यांना जमा करणे शक्य झाले नाही. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने तापमान ४० अंश डीग्री च्या आसपास असलेने उष्मघातचा वयोवृध्द लाभार्थ्यांना त्रास होवू शकतो. त्यामुळे गाव स्तरावर तलाठी कार्यालयात लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार लिक बैंक पासबुक, आधारकार्ड जमा करून घ्यावेत व पुढील आदेशानुसार जमा झालेले कागदपत्रे तहसिल कार्यालय (संजय गांधी) शाखेत जमा करावेत. कोणत्याही लाभार्थ्यांस तहसिल कार्यालयात पाठवु नये. असे आदेश तहसिल कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]