ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

जालना येथे मराठा समाजाच्या बांधवांवर लाठीचार्ज करणाऱ्यावर कारवाई करा दौंड पोलीसांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन…

पुणेरी टाइम्स टीम-

अंतरवाली सराटी जालना या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनात बसलेल्या आंदोलनकर्त्याना पोलीसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला, व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यांसाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कोणाच्या आदेशाने हे घडले, याचा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हांला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.

मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्या राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार आहे. तरी जे यात दोषी असतील त्यांच्यावर त्वरीत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जखमींना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने करण्यात येत आहे. तरी याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, शासनाने मराठ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करावा अन्यथा आगामी काळात होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा परिणामास सर्वस्वीपणे सरकार जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे..

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]