ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

जिल्ह्यातील प्रस्थापितांचा राजकीय ढाचा ढासळणार, जरांगे पाटलांच्या भुमिकेने जिल्ह्यातील अनेक आमदारांचा जीव टांगणीला…

पुणेरी टाइम्स टीमराज्यात निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे, अनेक आजी-माजी आमदारासह भावी आमदारांनी आपली जोरदार फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकारणाचे ढाचे डासाळणार आहेत यात शंका नाही. पाटील यांनी उद्या पुण्यात शांतता रॅली आयोजित केली आहे, या रॅलीचा प्रतिसाद पाहता व मराठा समाजाची भूमिका पाहता प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवायचा असाच काहीसा पवित्रा मराठा समाजातील सर्वसामान्य घटकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील राजकारण हे अनेक वर्षांपासून प्रस्थापितांच्या भोवती आहे. मात्र आता गरजवंत मराठा या प्रस्थापितांना धक्का देणार असून राजकीय पंढरी असणाऱ्या बारामतीत बारामती खुद्द अजित पवार यांच्या विरोधात मराठा समाजातील एक मोठी फळी काम करत आहे, बारामती सोबतच दौंड इंदापूर मध्येही शरद पवारांची गोची यशस्वी होण्याची शक्यता आहे. इंदापूर मध्ये मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते जरांगे पाटलांच्या भूमिकेसोबत आहेत. दौंड मधील ही चित्र असेच काहीसे आहे. जिल्ह्यातील अनेक गावात  जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी कोपरा बैठका घेण्यात आल्या आहेत, तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे स्वागताचे होर्डींग्ज लावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा दबदबा निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. त्यामुळे पूर्वीपासून राजकारणाशिवाय राहू न शकणाऱ्या राजश्री पुढाऱ्यांना समाजाच्या रोशामुळे आपले राजकीय करीअर पणाला लागणार आहे असे चित्र काहीसे निर्माण होऊ लागले झाले आहे‌. त्यामुळे यातून सावरण्यासाठी प्रस्थापित राजकारणी काय भूमिका अवलंबणार हे पाणी महत्त्वाचे आहे… मात्र जरांगे पाटलांच्या फॅक्टर पुढे राजकारणाचे भलेभले फॅक्टर फेल होऊ लागले आहेत त्यामुळे पाटलांना शह देणं राजकारणी मंडळींना  परवडणारे नाही मात्र आता सामना अटळ आहे..

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]