ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

घटनाबाह्य सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, “उद्धव ठाकरे” यांचा सरकारवर निशाणा ‘ठाकरे’ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

पुणेरी टाइम्स टीम – (मुंबई)

संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही, पशुखाद्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतातील उभी पिके पाण्याविना जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीच्या अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत. मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रश्नी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे, व सरकारवर निशाणा साधला आहे.

पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. असा सरकारवर निशाणा साधत मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील काकडी गावातील बाजरी, सोयाबीन शेतीची आज पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]